ड्रग्स प्रकरण चिघळले; खबर देणाराच बनला आरोपी...

उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात एका बिना नंबरप्लेट मोटरसायकलमध्ये ड्रग्ससदृश्य पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाहतूक पोलिसांना खबर देणारा नंदलाल वाधवा व त्याचा मुलगा राम वाधवा हेच मध्यवर्ती पोलिसांच्या फेऱ्यात अडकले आहेत. दरम्यान या प्रकरणी राहुल शर्मा याला अटक करण्यात आली आहे.


उल्हासनगर वाहतूक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, २८ एप्रिलला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेश तलरेजा हा तरुण बिना नंबरप्लेट मोटरसायकल घेऊन फिरतोय. त्यावरून बुधवारी वाहतूक पोलीस तलरेजा याची मोटारसायकल ताब्यात घेण्यासाठी हॉटेलवर गेले. गाडीच्या डिक्कीतून पोलिसांनी राजेशला सर्व साहित्य काढण्यास सांगून गाडी जप्त करत गाडीचे पेपर घेऊन पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले.


रात्री नऊच्या सुमारास नंदलाल वाधवा तिथे पोहोचले. त्यांनी गाडीत अमली पदार्थ असल्याचे सांगत गाडीची डिक्की खोलण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यावेळी डिक्कीत एक सफेद पावडरची पुडी आढळून आली. हे ड्रग्स असून गुन्हा दाखल करण्याची मागणी वाधवा यांनी केल्यानंतर वरिष्ठ पो. नि. विजय गायकवाड यांनी हा तपास मध्यवर्ती पोलिसांकडे सोपवला. येथील पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश राळेभात यांनी तपास सुरू केला. राहुल शर्मा या तरुणाने हा सर्व प्रकार घडवून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून शर्मा याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये