हापूसचा हंगाम पंधरा दिवसच

  102

पुणे (हिं.स.) यंदा मान्सूनच्या आगमनामुळे कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आहे. मे अखेरपर्यंत बाजारात आवक होईल, त्यानंतर आवक घटत जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आणखी सुमारे पंधरा दिवस हापूसची चव चाखता येईल. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसचे दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर ३०० ते ६०० रुपये असा आहे.


तापमान, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी हापूस बाजारात पाठवत आहेत. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. घटलेले दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवस कोकणातील हापूसची चव चाखता येईल. त्यानंतर मात्र गावरान हापूस बाजारात दाखल होण्यास सुरूवात होईल.


हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. अवकाळी पाऊस, धुक्यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्प्याटप्प्याने होत गेली. आवक नियमित होत नसल्याने आंब्याचे दर चढे होते.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली