हापूसचा हंगाम पंधरा दिवसच

पुणे (हिं.स.) यंदा मान्सूनच्या आगमनामुळे कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आहे. मे अखेरपर्यंत बाजारात आवक होईल, त्यानंतर आवक घटत जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आणखी सुमारे पंधरा दिवस हापूसची चव चाखता येईल. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसचे दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर ३०० ते ६०० रुपये असा आहे.


तापमान, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी हापूस बाजारात पाठवत आहेत. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. घटलेले दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवस कोकणातील हापूसची चव चाखता येईल. त्यानंतर मात्र गावरान हापूस बाजारात दाखल होण्यास सुरूवात होईल.


हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. अवकाळी पाऊस, धुक्यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्प्याटप्प्याने होत गेली. आवक नियमित होत नसल्याने आंब्याचे दर चढे होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये