औवेसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Share

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून भाजपा-मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलेला असताना आता मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ, असे म्हटले आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, औवेसी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमे लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेऊन हिंदुंना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही, कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केले तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले. आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.

तुझे थगडेही तिथेच बांधणार – मनसे

अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझे थडगे आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तान्याचे रक्त आहे, अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण – शिवसेना

“संभाजीनगरला वारंवार यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळाले नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळे सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर वाकून महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जे औरंगजेबाचे झाले तेच त्याच्या भक्तांचेही होईल, औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणा-याला तिथेच गाडू” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

3 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

4 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

39 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

56 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago