महिलेचा विद्युत धक्क्याने मृत्यु

गोंदिया (हिं.स.) : कपडे वाळत घालताना लोखंडी सळीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विद्युत धक्का बसून एका महिलेचा आणि बैलाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामधील पानगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. प्रेमकला जितेंद्र पटले असे या महिलेचे नाव आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार प्रेमकला नेहमी प्रमाणे कामे आटोपून बाजूच्या अंगणात असलेल्या लोखंडी तारेवर कपडे वाळविण्यासाठी गेल्या असता या तारेला विद्युत करंट असल्याने त्यांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांनी लाकडी काठीने विद्युत तारेला बाजूने करण्याचा प्रयत्न केला असता दरम्यान विद्युत प्रवाही तार जवळच असलेल्या बैलाच्या अंगावर पडल्याने बैलाचाही घटनास्थळी मृत्यू झाला.


घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली असून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतक महिलेचा पती हा कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेला असून त्यांना दोन मुले आहेत.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी