मीरा-भाईंदर मनपा शाळेच्या भिंतींवर अभ्यासक्रमातील चित्रे

अनिकेत देशमुख


भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेल्या शिक्षण अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांनी मीरा-भाईंदर शहरात महानगर पालिकेच्या ३६ शाळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. शाळांमध्ये असणारी कमतरता व शाळेतील शिक्षक-विद्यार्थी यांना होणाऱ्या समस्या व शाळेतील विद्यार्थी यांना अभ्यास उपयोगी सर्व सामग्री मिळवून देण्याचा प्रयत्न भोसले यांनी सुरू केला आहे.


प्रियंका भोसले यांनी मनपा शाळांना भेट दिल्यानंतर सर्व शाळांच्या भिंतीचा रंग खराब झाल्याने त्यांची रंगोटी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भूगोल, बीजगणित, इतिहास, खेळातील काही चित्र, कार्टूनचे चित्र, कवायतीचे चित्र याचबरोबर आपले शहर व परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, याकरता स्वच्छतेशी निगडीत चित्रही सर्व मनपा शाळांच्या भिंतींवर काढण्यात येत आहेत.


पालिकेच्या ३६ शाळांमध्ये इयत्ता ८वीचे वर्ग असणाऱ्या आठ शाळा आहेत व सध्या १ली ते ८वीच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रियंका भोसले यांनी मनपा शाळांना भेट दिल्यानंतर सर्व शाळांच्या भिंतीचा रंग खराब झाल्याने त्यांची रंगोटी करण्याचे आदेश दिले होते.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे