२०२०-२१ मध्ये रत्नागिरीत सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यात वर्ष २०२०-२१ मध्ये ११ हजार ४१४ मृत्यू झाले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने झाले होते. तर एड्सने ३६ मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. १३० आत्महत्या झाल्या असून रहदारीतील अपघातामुळे १७६ लोकांचा मृत्यू झाला.



रत्नागिरी जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केलेले असतानाच हृदविकाराच्या झटक्याने १५२४ पुरुषांचा आणि १२६९ महिलांचा मृत्यू झाला. तसेच क्षयरोग, निमोनिया, पक्षाघात, कर्करोग, आत्महत्या आदींमुळेही मृत्यू झाले असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एड्सने ३६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २० पुरुषांचा समावेश आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे १३४ पुरुषांचा व ४२ महिलांचा मृत्यू झाला आहे.



बाळंतपणात मातेचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून रत्नागिरी जिल्ह्यात बाळंतपणामुळे १२ महिलांचा मृत्यू झाला तर मूत्रपिंड खराब झाल्यामुळे ३५८ मृत्यू झाले. विविध कारणांमुळे ११ हजार ४१४ मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य अिधकारी यांच्याकडून संबंधित विभागांना देण्यात आली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात