२०२०-२१ मध्ये रत्नागिरीत सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने

  99

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यात वर्ष २०२०-२१ मध्ये ११ हजार ४१४ मृत्यू झाले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने झाले होते. तर एड्सने ३६ मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. १३० आत्महत्या झाल्या असून रहदारीतील अपघातामुळे १७६ लोकांचा मृत्यू झाला.



रत्नागिरी जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केलेले असतानाच हृदविकाराच्या झटक्याने १५२४ पुरुषांचा आणि १२६९ महिलांचा मृत्यू झाला. तसेच क्षयरोग, निमोनिया, पक्षाघात, कर्करोग, आत्महत्या आदींमुळेही मृत्यू झाले असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एड्सने ३६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २० पुरुषांचा समावेश आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे १३४ पुरुषांचा व ४२ महिलांचा मृत्यू झाला आहे.



बाळंतपणात मातेचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून रत्नागिरी जिल्ह्यात बाळंतपणामुळे १२ महिलांचा मृत्यू झाला तर मूत्रपिंड खराब झाल्यामुळे ३५८ मृत्यू झाले. विविध कारणांमुळे ११ हजार ४१४ मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य अिधकारी यांच्याकडून संबंधित विभागांना देण्यात आली.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या