दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक रोड  : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारागृहाचे अधीक्षक यांची साप्ताहिक संचारफेरी सुरू असताना शिक्षाबंदी विजयकुमार आनंदकुमार रॉय याने अधीक्षकांना अरेरावी करीत “तुमे मेरे को तकलीफ क्यों दे रहे हो? मेरे को शांती से यही पे रहने दो,” असे म्हणत त्याने त्याच्यासोबत खिशात लपवून आणलेल्या लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने स्वत:च्या डाव्या हाताने सपासप वार करून जखम करून घेतले. तसेच अंगावरील सदरा फाडून त्याने स्वत:च्या बरगडीलादेखील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने जखम करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कारागृहातील दवाखाना विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विजयकुमारविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दुसर्या घटनेत न्यायाधीन बंदी सागर राहुल जाधव (२३) हा बॅरेक नंबर ४समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढला. त्याने दोरी बांधून आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सागर जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली