दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक रोड  : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारागृहाचे अधीक्षक यांची साप्ताहिक संचारफेरी सुरू असताना शिक्षाबंदी विजयकुमार आनंदकुमार रॉय याने अधीक्षकांना अरेरावी करीत “तुमे मेरे को तकलीफ क्यों दे रहे हो? मेरे को शांती से यही पे रहने दो,” असे म्हणत त्याने त्याच्यासोबत खिशात लपवून आणलेल्या लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने स्वत:च्या डाव्या हाताने सपासप वार करून जखम करून घेतले. तसेच अंगावरील सदरा फाडून त्याने स्वत:च्या बरगडीलादेखील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने जखम करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कारागृहातील दवाखाना विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विजयकुमारविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दुसर्या घटनेत न्यायाधीन बंदी सागर राहुल जाधव (२३) हा बॅरेक नंबर ४समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढला. त्याने दोरी बांधून आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सागर जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात