वसई-विरारमध्ये लसीकरणास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  83

नालासोपारा :राज्यभरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लसीकरण करण्यात सुरुवात झाली. वसईत ८ केंद्रांवर ७५०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. तसेच, वसईतही मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी प्रतिसाद मिळाला. नालासोपारा, विरार, वसई या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर पालकांसह मुलांनीही मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेला लसीकरणाला पालकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसला.

सर्वत्र लहान मुलांसाठी आता लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वय १५ ते १८ वर्षांपर्यंत मुलांना लस देण्यात येणाऱ्या गेले अनेक महिने याबाबत सातत्याने सुरू होत्या. अखेर या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. वसईत ८ केंद्रांवर ७५०० डोस उपलब्ध झाले होते. पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक मुलांनी याचा लाभ घेतला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होत असतानाच शाळा व कॉलेज पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या वर्षी शाळा कॉलेज सुरू झाली तर लसीकरण पूर्ण झाल्यामुळे कुठेही जाता येणार असल्याने मुलांनी आनंद व्यक्त केला.
Comments
Add Comment

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर