मालवण समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

सिंधुदुर्ग : ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी मालवणात राज्यभरातले अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या पाहुणचारासाठी पर्यटन व्यावसायिक सुद्धा सज्ज झाले आहेत.


गेले दोन तीन दिवस मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी किनारपट्टी ते बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत, हॉटेल्स लॉजिंग, रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल झाले आहेत, कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दीड वर्ष पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र आता हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला आहे. ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक मालवण भागात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालवण येथील शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्ग वर मालवण बंदर जेटी चीवला बीच तारकर्ली देवबाग दांडी या किनारपट्टी परिसरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, खाजगी सरकारी रिसॉर्ट सुद्धा गजबजून गेली आहेत.

राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घेतली असून कोरोनाचे अटी शर्तीं आणि नियम लक्षात घेऊन पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे