मालवण समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

सिंधुदुर्ग : ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी मालवणात राज्यभरातले अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या पाहुणचारासाठी पर्यटन व्यावसायिक सुद्धा सज्ज झाले आहेत.


गेले दोन तीन दिवस मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी किनारपट्टी ते बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत, हॉटेल्स लॉजिंग, रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल झाले आहेत, कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दीड वर्ष पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र आता हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला आहे. ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक मालवण भागात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालवण येथील शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्ग वर मालवण बंदर जेटी चीवला बीच तारकर्ली देवबाग दांडी या किनारपट्टी परिसरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, खाजगी सरकारी रिसॉर्ट सुद्धा गजबजून गेली आहेत.

राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घेतली असून कोरोनाचे अटी शर्तीं आणि नियम लक्षात घेऊन पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात