नाताळ, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाउसना नोटिसा

  76

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असल्याने नाताळ , नववर्षाचे स्वागत यामुळे शहर व जिल्ह्यातील हॉटेलांमध्ये मोठा जल्लोष होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून , कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे . त्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल्स रिसॉर्ट, फार्महाउस व इतर पर्यटन क्षेत्रांना नोटिसा बजावण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४००च्या जवळपास आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्याने आर्थिक चक्रही वेगवान झाले आहे. त्यातच वर्षअखेरीस नाताळ व थर्टीफर्स्ट निमित्त हॉटेल, रिसॉर्ट , फार्महाउस , पर्यटन स्थळांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.


मात्र , राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने कोरोना संसर्गनियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे, हा एकमेव पर्याय आहे. मात्र गर्दीत सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर , स्वच्छता या नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ही शक्यता ओळखून पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत पार्ट्यांचे आयोजन करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, गर्दी झाल्यास व कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासह इतर ठिकाणी आयोजित होणाऱ्या पार्ट्यांमध्ये नियम पालनाची जबाबदारी आयोजक , हॉटेल व रिसॉर्ट व्यवस्थापकांची आहे. त्याचप्रमाणे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकार टाळण्यासाठी वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिसांसह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. या प्रकरणी हॉटेल व रिसॉर्ट व्यवस्थापकांसह पार्ट्यांचे आयोजन होऊ शकतील, अशा संभाव्य ठिकाणांच्या व्यवस्थापकांसह आयोजकांना याबाबतच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत .

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक