थंडीचा कडाका वाढला; द्राक्ष उत्पादक चिंतेत

  164

नाशिक  : जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्याचे तापमान ११.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. थंडीमुळे नाशिककर गारठून गेले असून या थंडीचा आनंदही अनेक नागरिक घेताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले आहे.बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्षांची पंढरी पूर्णपणे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



उत्तर भारतामध्ये थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावर देखील होत असून उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थंडीची तीव्रता वाढत आहे.उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे ५.५ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर त्याखालोखाल जळगाव येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.



दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून सातत्याने पारा रोज घसरत आहे. जिल्ह्यामध्ये देखील थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून दोन दिवसांमध्ये तापमान हे चार अंश सेल्सिअसने कमी होऊन सोमवारी सकाळी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. थंडीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील नागरिकांनी वेगवेगळ्या मैदानांवर व्यायाम करण्यासाठी तसेच जॉगिंगसाठी गर्दी केली आहे. तर जागोजागी शेकोट्या देखील पेटविण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले असून निफाडमध्ये सोमवारी सकाळी ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. यापूर्वी झालेला बेमोसमी पाऊस आणि वाढती थंडी यामुळे द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक द्राक्ष वाचविण्यासाठी आता धावपळ करीत आहे.


थंडीत वाढ झाल्यामुळे द्राक्षाच्या घडांवर भुरी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी बेमोसमी पावसामुळे डावणी या रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात द्राक्षावर झाला होता. त्यातून शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष वाचविली. मात्र आता अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे व थंडीपासून रक्षण करण्यासाठी आता शेतकरी शेकोट्या पेटवून द्राक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या भागात थंडीचा रब्बी पिकांना मात्र चांगला फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर नाशिक जिल्ह्यातील वाढती थंडी लक्षात घेऊन नागरिकांनी आता उबदार कपडे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची