Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नवनवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने अधिकृत प्रभाग रचना (वॉर्ड) कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.



प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे


 

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. 'गुगल अर्थ'च्या साहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.


२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. २३ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.


प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. ७ एप्रिल रोजी प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. तर, २१ एप्रिल २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम करतील.


४ मे २०२६ रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने, ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य