Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नवनवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने अधिकृत प्रभाग रचना (वॉर्ड) कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.



प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे


 

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. 'गुगल अर्थ'च्या साहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.


२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. २३ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.


प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. ७ एप्रिल रोजी प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. तर, २१ एप्रिल २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम करतील.


४ मे २०२६ रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने, ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त