विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.


या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या या घटनादत्त स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भीमनवार यांची ही नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) असेल. दरम्यान, भीमनवार यांनी कार्यभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.


राज्य सरकारच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे मोठे आव्हान आता नवनियुक्त अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कोण आहेत विवेक भीमनवार?


 

विवेक भीमनवार हे २००९ च्या बॅचचे 'महाराष्ट्र कॅडर'चे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या पदव्या संपादन केल्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. परिवहन आयुक्त असताना त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर 'बाईक टॅक्सी' सेवांविरुद्ध कठोर मोहीम उघडली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध