राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे निर्देश


मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.


मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपसचिव प्रज्ञा वाळके, उपसचिव निरंजन तेलंग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात नवीन रस्त्यांची कामे करताना वाहतूक रहदारीचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विशेषतः डोंगराळ भागातील तसेच जास्त पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रांतील रस्त्यांच्या बांधणीत दर्जेदार व टिकाऊ कामे होण्यासाठी ठराविक पॅरामीटर्स निश्चित करून रस्त्यांचे आयुष्यमान वाढेल अशी कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरांना व जिल्ह्यांना जोडणारे रस्ते या पद्धतीने विकसित करावेत, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.


पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या वाहतूक वर्दळीचा विचार करता शहरालगतची सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती मार्ग यांना जोडणारे मुख्य रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. यासाठी अधिकारी स्तरावर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.


याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे व प्रसाधनगृह केंद्रांची उभारणी करण्यासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.


सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युटी (HAM) टप्पा-३ अंतर्गत १०,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ही कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.


तसेच नाशिक परिक्रमा मार्ग, पुणे–शिरूर उन्नत मार्ग, हडपसर–यवत मार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग आदी महामार्गांच्या कामांचा आढावा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला.


राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या कामकाजाचाही आढावा यावेळीते घेण्यात आला व या कामांना चालना देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच भीमाशंकर ते कर्जत या नवीन रस्त्याच्या आखणीबद्दल व या रस्त्याच्या बांधकाम नियोजचासुद्धा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

Comments
Add Comment

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

Jejuri Accdent : जेजुरी दुर्घटनेनंतर वारीत आणखी एक अपघात; अहिल्यानगरात भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले

पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत