कोकण रेल्वेच्या मार्गावर आणखी ३ स्पेशल ट्रेन

खेड (प्रतिनिधी) : ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरेल्वेच्या चार स्पेशल रेल्वेगाड्या शनिवारपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागल्या आहेत. या पाठोपाठ पश्चिम रेल्वे प्रशासनाने आणखी ३ साप्ताहिक गाड्या जाहीर केल्या आहेत. सुरत-मडगावच्या दोन फेऱ्यांसह बांद्रा-करमळी स्पेशल गाडीचा समावेश आहे. २१ डिसेंबरपासून वसईमार्गे धावणाऱ्या तीनही गाड्यांचे आरक्षण १९ डिसेंबरपासून खुले झाले आहे.



ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह जाहीर करण्यात आलेल्या स्पेशल गाड्यांना आतापासून गर्दी उसळत आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहेत. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.



मध्यरेल्वेच्या दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमळी, करमळी-पनवेल या आरक्षित स्पेशल गाड्या शनिवारपासून धावत आहेत. ०९१९३/०९१९४ क्रमांकाची सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल २१ ते २८ डिसेंबर याकालावधीत धावेल. सुरत येथून सायंकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता सुरतला पोहचेल. १७ डब्यांच्या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी आदी ठिकाणी थांबे आहेत.



०९१८७/०९१८८ क्रमांकाची सुरत-मडगाव साप्ताहिक स्पेशल २२, २४ व २९ डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. सुरत येथून सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात २३, २५, ३० डिसेंबर दरम्यान धावणारी साप्ताहिक स्पेशल मडगाव येथून दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी सुरतला पोहोचेल. या गाडीला १९ डबे जोडण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील