एम.आय.डी.सी. विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

  114

देवा पेरवी


पेण : तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाने धडकणार आहेत.



पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावांतील २११० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पासाठी सुमारे २११० एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे.


सदरच्या जमिनीची मागणी खासगी कंपनीने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन कायद्याअंतर्गत पास थ्रू पद्धतीने दिली जाणार आहे. सदरच्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीनी निवेदनाद्वारे विरोध दर्शवला आहे. ३२/२ च्या वैयक्तिक नोटिसींना बाधित शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. ३२/२ च्या हरकतीवर उपविभागिया अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सुनावणीदरम्यान तोंडी व लेखी विरोध नोंदवला आहे.



शेतकरी संघर्ष समिती (११ गाव) गडब-पेण यांनी वेळोवेळी औद्योगिक प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतींनी मासिकसभेत व ग्रामसभेत नियोजित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पाविरोधात ठराव पारित करून शासनास कळवले आहे. त्याचप्रमाणे उद्योगमंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेते सर्व पक्षीय नेते मंडळी यांना सदर प्रकल्प रद्द करावा, यासाठी प्रत्यक्ष भेटून विरोध दर्शवला आहे.



ज्या कंपनीसाठी हे भूसंपादन होत आहे त्या कंपनीने येथील पिकती भात शेती नियोजनपूर्वक शासनातील काही अधिकारीवर्गास हाताशी धरून कंपनीच्या मोठमोठ्या मालवाहू बोटी जेटीवर येण्यासाठी खाडीचे खोलीकरण केले. त्यामुळे खाडीच्या संरक्षण बांधांना मोठमोठ्या खांडी गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर खारेपाणी शेतीत शिरून पाच-सहा वर्षांपासून शेती नापिक झाली आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला