एम.आय.डी.सी. विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

देवा पेरवी


पेण : तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाने धडकणार आहेत.



पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावांतील २११० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पासाठी सुमारे २११० एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे.


सदरच्या जमिनीची मागणी खासगी कंपनीने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन कायद्याअंतर्गत पास थ्रू पद्धतीने दिली जाणार आहे. सदरच्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीनी निवेदनाद्वारे विरोध दर्शवला आहे. ३२/२ च्या वैयक्तिक नोटिसींना बाधित शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. ३२/२ च्या हरकतीवर उपविभागिया अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सुनावणीदरम्यान तोंडी व लेखी विरोध नोंदवला आहे.



शेतकरी संघर्ष समिती (११ गाव) गडब-पेण यांनी वेळोवेळी औद्योगिक प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतींनी मासिकसभेत व ग्रामसभेत नियोजित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पाविरोधात ठराव पारित करून शासनास कळवले आहे. त्याचप्रमाणे उद्योगमंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेते सर्व पक्षीय नेते मंडळी यांना सदर प्रकल्प रद्द करावा, यासाठी प्रत्यक्ष भेटून विरोध दर्शवला आहे.



ज्या कंपनीसाठी हे भूसंपादन होत आहे त्या कंपनीने येथील पिकती भात शेती नियोजनपूर्वक शासनातील काही अधिकारीवर्गास हाताशी धरून कंपनीच्या मोठमोठ्या मालवाहू बोटी जेटीवर येण्यासाठी खाडीचे खोलीकरण केले. त्यामुळे खाडीच्या संरक्षण बांधांना मोठमोठ्या खांडी गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर खारेपाणी शेतीत शिरून पाच-सहा वर्षांपासून शेती नापिक झाली आहे.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक