भंडारा : दोन चिमुकल्यांसह मातेचे विषप्राशन, मुलगा दगावला

Share

भंडारा- भंडारा जिल्ह्याच्या ठाणा गावात एका ३५ वर्षीय आईनेच आपल्या पोटच्या मुला मुलींसह स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात १४ महिन्याच्या कार्तिक शहारे या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर ५ वर्षीय विधी आणि ३५ वर्षीय वंदना यांच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्ययात उपचार सुरु आहेत.

ठाणा गावातील ज्ञानेश्वर शहारे आणि त्यांची पत्नी वंदना शहारे हे १३ डिसेंबरला संध्याकाळी बाजारातून घरी परत आले. कुटूंबियांनी रात्री जेवण केल्यावर वंदना डोके दुखत असल्याचे कारण सांगत घराशेजारी असलेल्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली आणि मेडिकलमधून तांदळामध्ये टाकण्याचे औषध घेऊन आली. वंदनाने आपल्या १४ महिन्यांच्या मुलाला आणि ५ वर्षाच्या मुलीला हे औषध पाजले आणि स्वतःही प्राशन करीत झोपण्यासाठी गेली असता मध्यरात्री अचानक मुलामुलींना उलट्या आणि मळमळ होत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.

तिघांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल करण्यात आले होते. १४ महिन्याचा कार्तिक याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर ५ वर्षीय मुलगी आणि ३५ वर्षीय वंदना हिला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरु आहेत. मात्र वंदनाने मुलांसह आत्महत्येचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नसून जवाहर नगर पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago