भंडारा : दोन चिमुकल्यांसह मातेचे विषप्राशन, मुलगा दगावला

भंडारा- भंडारा जिल्ह्याच्या ठाणा गावात एका ३५ वर्षीय आईनेच आपल्या पोटच्या मुला मुलींसह स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात १४ महिन्याच्या कार्तिक शहारे या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर ५ वर्षीय विधी आणि ३५ वर्षीय वंदना यांच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्ययात उपचार सुरु आहेत.

ठाणा गावातील ज्ञानेश्वर शहारे आणि त्यांची पत्नी वंदना शहारे हे १३ डिसेंबरला संध्याकाळी बाजारातून घरी परत आले. कुटूंबियांनी रात्री जेवण केल्यावर वंदना डोके दुखत असल्याचे कारण सांगत घराशेजारी असलेल्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली आणि मेडिकलमधून तांदळामध्ये टाकण्याचे औषध घेऊन आली. वंदनाने आपल्या १४ महिन्यांच्या मुलाला आणि ५ वर्षाच्या मुलीला हे औषध पाजले आणि स्वतःही प्राशन करीत झोपण्यासाठी गेली असता मध्यरात्री अचानक मुलामुलींना उलट्या आणि मळमळ होत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.


तिघांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल करण्यात आले होते. १४ महिन्याचा कार्तिक याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर ५ वर्षीय मुलगी आणि ३५ वर्षीय वंदना हिला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरु आहेत. मात्र वंदनाने मुलांसह आत्महत्येचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नसून जवाहर नगर पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह