एसटी संप : खासगी वाहन चालकांचा मनमानीपणा

  114

वाडा (वार्ताहर) :मागील एक महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी चालक-वाहकांच्या संपामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. त्यांच्यासह रोजचा प्रवास खासगी वाहनाने करणाऱ्यांनाही हा प्रवास खिशाला खूपच जड जात आहे. तथापि, परवडत नसताना जास्तीची रक्कम मोजून अनेकजण प्रवास करत आहेत. त्यामुळे खासगी वाहन चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. दुसरीकडे, एसटी कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.



वाडा तालुक्यातील सापने गावातील महिलांनी एसटी आगारातील वाहतूक व्यवस्थापकांना गाठून गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरू करा, अशी गळ घातली आहे. सापने गाव महामार्गापासून ३ किलोमीटर दूर आहे. वाटेत घनदाट झाडी असून काही ठिकाणी रस्ता निर्जन आहे. गावातील ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी या रस्त्यावरून प्रवास करत शाळा-कॉलेजात जातात. तसेच रोज रोख व दुप्पट पैसे मोजून शाळा करणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना डोईजड होते. अशीच परिस्थिती वाडा तालुक्यातील इतर गावांतील विद्याथ्यांची आहे. त्यामुळे अनेक गाव-खेड्यात विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे.



दरम्यान, वाडा एसटी आगारातील केवळ १२ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तुरळक प्रवासी वाहतूक सुरू असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प आहे. यामुळे खासगी वाहन चालक मनमानी भाडे आकारून विद्यार्थी व प्रवाशांची लूट करत आहेत.


Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना