भाजपचा नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा

नाशिक : नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यासाठी भाजपतर्फे मोर्चा काढण्यात आला. नाशिकचे संपर्क प्रमुख माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर देखील नाराजी व्यक्त केली.



नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी दुपारी ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे आणि नुकताच ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चाची हाक दिली होती. हा मोर्चा त्रिंबक नका शालिमार चौक येथून मेन रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.


नाशिक जिल्ह्याचे संपर्क नेते जयकुमार रावल तसेच आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे ,राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, पवन भगुरकर, प्रशांत जाधव, नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती गणेश गीते, अरुण पवार कमलेश बोडके, देवदत्त जोशी, चंद्रशेखर पंचाक्षरी, यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे