माथेरानला सोनकीचा साज

कर्जत (वार्ताहर) : माथ्यावरचे रान अशी बिरुदावली माथेरानला लाभली आहे. ती काही उगीच नाही. इथला निसर्ग, ऑक्सिजनचा खजिना, वातावरणीय बदल, ऊन पावसाचा खेळ या सगळ्या गोष्टी पर्यटकांना भुरळ घालत असतात. अशातच पावसाचा जोर कमी होऊन शिरशिरी आणणारा हिवाळा सुरू होताना येथे वेगवेगळी फुले बहरत असतात. त्यातच माथेरानच्या डोगरांवर पसरलेली सोनकी फुले यामुळे माथेरानच्या सौंदर्याला सोनकीच्या साज चढत असून माथेरान सोन्यासारखे लखलखत असते. निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी असते.


मुंबई-पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर समुद्रसपाटीपासून ८०० मीटर अंतरावर माथेरान वसले आहे. सन १८५०मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला होता. आज जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आवर्जून भेट देतात. माथेरानने आजही आपले वेगळे अस्तित्व जपले आहे. पर्यावरण संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये आजही वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोड्यांची रपेट, मिनी ट्रेनचा रंजक प्रवास, लालमातीचा हळुवार स्पर्श घरी जाईपर्यंत आपल्या सोबत राहतो. येथे असलेल्या पॉईंटची स्वतःची वेगळी खासियत असून हवेतील गारवा पर्यटकांना या जगाचा विसर पाडतो. या ठिकाणी पर्यटकांना ऑक्सिजनचा अफाट खजिना मिळतो. यासोबत येथे वेगवेगळॆ वन्यजीव, आणि वनसंपदा यात पर्यटक गुरफटून जात इथलाच होऊन जातो.


जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात माथेरानमध्ये २०० ते ३०० मिमी एवढा पाऊस पडतो. त्यासोबत पाऊस जाताना सुरू होणाऱ्या हिवाळ्यात येथील डोंगर-दऱ्या बहरतात ते सोनकीच्या पिवळ्या फुलांनी. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात असलेल्या कासपठारावर या दिवसांत फुले बहरत असतात. अशीच परिस्थिती माथेरानमध्ये असते. या सोनकीच्या फुलांनी माथेरानचे डोंगर सोन्यासारखे लखलखत असतात. अनेकदा ही सोनकीची फुले नवरात्रीत देवीला वाहण्याचीदेखील परंपरा आहे. सोनकीची ही फुले रानटी असली तरी ती सूर्यफुलाप्रमाणे भासतात. मात्र, ती लहान असतात. वर्षातून एकदा बहरणाऱ्या या फुलांमध्ये रमण्याची ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. माथेरानमध्ये येणारे पर्यटक विविध पॉईंट फिरत असताना ही फुले त्यांनाही टवटवीत करतात.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी