छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्या रक्ताचा

Share

निलेश राणे यांचे भावोद्गार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी रक्ताचा आहे. आम्ही शिवप्रेमी आहोत, महाराज हेच आमचं जग आहे. देवाच्या स्थानी आम्ही महाराजांना बघतो. त्यांचे संस्कार आमच्या रक्तात आहेत. मुघलांसारखे एवढं मोठं संकट अंगावर असताना महाराज उभे ठाकले. तीच ऊर्जा आमच्यात येते त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो समोर विरोधक कितीही मोठा असो त्याला अंगावर घेण्याची ताकद आमच्यात असते, असे भावोद्गार भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या शिवउद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे ही सावंतवाडीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. या पुढील पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा. ते कसे जगले असतील? कसे लढले असतील? यापासून प्रेरणा घेऊन पुढील पिढी आदर्श घडावी यासाठी महाराजांचा हा पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होते हे देखील माझे भाग्यच आहे. मला मनापासून जे कार्यक्रम आवडतात त्यापैकी हा एक सोहळा असून मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, न.प. गटनेते राजू बेग, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा समिती सभापती उदय नाईक, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान उपस्थित होते.

‘संजू परब महाराजांचे संस्कार विसरले नाहीत’

संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय. मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं, प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी हे काम करत असताना नेहमीच राजकारण बाजूला ठेवलं. माझ्या शहराला जी गरज आहे त्यात राजकारण येता कामा नये हे त्यांनी नेहमी पाहिलं. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम करत असताना संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधीही विसरले नाहीत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

3 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

5 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

5 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

8 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

8 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

8 hours ago