पुणे-मुंबई प्रवासात ई-बसची भर

मुंबई (प्रतिनिधी): इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड लेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनीने (एमईआय समूह कंपनी) बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.


विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून या इलेक्ट्रिक बसच्या नियमित प्रवासफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.


इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा प्रवासही किफायतशीर, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवास होईल असा कंपनीचा दावा आहे. शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४५ प्रवासी बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.


इव्हे ट्रान्सच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुरक्षेचीही चांगली काळजी घेण्यात आली आहे. यात अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यामध्ये टीव्हीयु प्रमाणित इयू मानांकित एफडीएसएस प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली एडीएएस प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि आयटीएस प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनिक अलार्म सिस्टिम आणि इमर्जन्सी लाईट इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय बसमध्ये बसवलेले डी-फ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत करतात.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद