पुणे-मुंबई प्रवासात ई-बसची भर

मुंबई (प्रतिनिधी): इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड लेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनीने (एमईआय समूह कंपनी) बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.


विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून या इलेक्ट्रिक बसच्या नियमित प्रवासफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.


इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा प्रवासही किफायतशीर, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवास होईल असा कंपनीचा दावा आहे. शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४५ प्रवासी बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.


इव्हे ट्रान्सच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुरक्षेचीही चांगली काळजी घेण्यात आली आहे. यात अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यामध्ये टीव्हीयु प्रमाणित इयू मानांकित एफडीएसएस प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली एडीएएस प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि आयटीएस प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनिक अलार्म सिस्टिम आणि इमर्जन्सी लाईट इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय बसमध्ये बसवलेले डी-फ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत करतात.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे