पुणे-मुंबई प्रवासात ई-बसची भर

  65

मुंबई (प्रतिनिधी): इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड लेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनीने (एमईआय समूह कंपनी) बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.


विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून या इलेक्ट्रिक बसच्या नियमित प्रवासफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.


इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा प्रवासही किफायतशीर, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवास होईल असा कंपनीचा दावा आहे. शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४५ प्रवासी बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.


इव्हे ट्रान्सच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुरक्षेचीही चांगली काळजी घेण्यात आली आहे. यात अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यामध्ये टीव्हीयु प्रमाणित इयू मानांकित एफडीएसएस प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली एडीएएस प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि आयटीएस प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनिक अलार्म सिस्टिम आणि इमर्जन्सी लाईट इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय बसमध्ये बसवलेले डी-फ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत करतात.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक