दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव

ज्योती जाधव


कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.


घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलाला दर्जानुसार प्रतिकिलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. तसेच, शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे छोट्या झेंडूला ७० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ग्राहकांची अडचण झाली असूनही झेंडूचे फुले खरेदी करत आहे.


बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेशी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केला.


मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच, मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. मात्र, शासनाने मंदिर खुले करण्याचे आदेश दिल्याने आता फुलांची मागणी वाढली असून त्याप्रमाणे किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. मात्र, हे भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका