दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव

ज्योती जाधव


कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.


घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलाला दर्जानुसार प्रतिकिलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. तसेच, शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे छोट्या झेंडूला ७० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ग्राहकांची अडचण झाली असूनही झेंडूचे फुले खरेदी करत आहे.


बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेशी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केला.


मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच, मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. मात्र, शासनाने मंदिर खुले करण्याचे आदेश दिल्याने आता फुलांची मागणी वाढली असून त्याप्रमाणे किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. मात्र, हे भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात