Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीकुर्ल्यातील आगीत २० दुचाकी जळून खाक

कुर्ल्यातील आगीत २० दुचाकी जळून खाक

मुंबई : कुर्ला पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळच्या नेहरूनगर परिसरातील धम्म सोसायटीत बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या १८ वॉटर टँकर आणि १६ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. आगीच्या झळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग लावण्यात आल्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहे.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -