Monday, August 10, 2026

Nashik : विभाजनानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला 'बूस्टर' ! प्रशासकांच्या कारभाराला वेग

Nashik : विभाजनानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला 'बूस्टर' ! प्रशासकांच्या कारभाराला वेग

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) ऐतिहासिक विभाजनानंतर नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तीन स्वतंत्र बाजार समित्यांच्या कामकाजाला आता वेग आला आहे. प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समिती परिसरातील स्वच्छता, खड्डेमुक्ती तसेच नव्या समित्यांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यावर भर दिला जात आहे.

नाशिक, त्र्यंबक आणि पेठ स्वतंत्र बाजार समित्या

शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी थेट बाजार समिती (Agricultural Produce Market Committee)प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी खासदार तथा बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपली पालेभाजी व फळभाजी विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने नाशिकबाजार समितीचे विभाजन करून नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आणल्या आहेत. या निर्णयानुसार जुने संचालक मंडळ बरखास्त होऊन सध्या प्रशासकांचे कामकाज सुरू आहे.

बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन तीन नवीन समित्या अस्तित्वात आल्या आहेत. प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी बाजार समिती प्रशासन किंवा प्रशासकांशी संपर्क साधावा. तसेच माझ्याशी संपर्क साधल्यास मीदेखील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन असे बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) यांनी म्हटलें आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >