Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) आता निर्माल्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त व प्रतिनिधी यांना एकत्र आणत निर्माल्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार असून, यासाठी १८ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Nashik Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी अवघा १ दिवस शिल्लक राहिला आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ...
मंदिर विश्वस्तांची उद्या विशेष बैठक
सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होत असल्याने पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation) हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. भाविकांकडून देवतांना अर्पण करण्यात येणारी फुले, पाने आणि अन्य पूजासाहित्य यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. याची योग्य विल्हेवाट न लागल्यास पर्यावरण आणि विशेषतः गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात निर्माल्य व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही धार्मिक नगरे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. वर्षभर येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. सिंहस्थ काळात ही संख्या अनेक पटींनी वाढते. त्यामुळे मंदिर परिसरात निर्माण होणारे निर्माल्य, फुले आणि पूजेनंतर जमा होणारे इतर साहित्य यांचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.
मुंबई : पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री ...
निर्माल्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन
उद्या होणाऱ्या बैठकीत मंदिर स्तरावरील निर्माल्य संकलन व्यवस्था, आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांशी समन्वय याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. मंदिर संस्थानांच्या सक्रिय सहभागातून निर्माल्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन करून गोदावरी नदीचे संवर्धन करणे आणि सिंहस्थपूर्वी कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था उभारणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यासोबतच ‘वेस्ट टू वेल्थ’ अर्थात कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या संकल्पनेलाही या उपक्रमात महत्त्व दिले जाणार आहे. संकलित निर्माल्यापासून अगरबत्ती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग किंवा इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न राहणार आहे.
Nashik Water Crisis : नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाण्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची ...
निर्माल्याचे व्यवस्थापनही आदराने होणे गरजेचे
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी सांगितले की, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच आदराने आणि जबाबदारीने होणे गरजेचे आहे. मंदिर संस्थान, नागरिक आणि विविध घटकांच्या सहभागातून गोदावरी संवर्धनाबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरसाठी दीर्घकालीन उपयोगी ठरेल असे शाश्वत मॉडेल विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माल्य व्यवस्थापनाचे हे आव्हान प्रभावीपणे पेलण्यासाठी मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधींची मते जाणून घेत त्यांच्या सहकार्याने एक आदर्श आणि अनुकरणीय व्यवस्था उभारण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ ‘हरित कुंभ’ म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






