माळशेज : माळशेज घाट परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून. तसेच, एका लहान मुलासह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक : वडाळा नाका परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई ...
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना त्वरित टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टोकावडे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक : नाशिकमधील रिंगरोड प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. नाशिक कुंभमेळा पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन ...
या दुर्घटनेत एका लहान मुलासह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. सध्या जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.






