Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

आर्थर रोड तुरुंगात रवानगी

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. न्यायालयाने राऊतांना घरचे जेवण आणि औषधे देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून लावला जात असून विविध अकाउंटवरून राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांमधून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात असून, ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -