नवी दिल्ली : एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp chief) प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईबाबतही विधान केले.
शरद पवार म्हणाले की, संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीची कारवाई आप आणि काँग्रेसला एकत्र आणेल. ईडीची ही कारवाई ही बदला असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास विभागाचा वापर त्या नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी केले जात आहेत जे सरकारनुसार चालत नाहीत.
राज्यातील वातावरण भाजपच्या बाजूने नाही
पवार यांनी यावेळी कर्नाटकात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा हवाला दिला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. महाराष्ट्राबाबत बोलताना पवार म्हणाले, जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सरकार बनू शकते.