Friday, May 3, 2024
Homeकोकणरत्नागिरीUday Samant : पालकमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर

Uday Samant : पालकमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४.४५ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.

पहाटे ५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ संदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १२ वाजता राष्ट्रीय जलजिवन मिशन संदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १ वाजता विविध विकासकामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).

दुपारी २.४५ वाजता किशोर नारायण मोरे यांची सुकन्या चि.सौ.कां. पर्णिका आणि दिलीप सुर्वे यांचे सुपुत्र चि.जयेश यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : विवेक हॉल, हॉटेल विवेक, माळनाका, रत्नागिरी). दुपारी ३.३० वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सायंकाळी ५.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायंकाळी ६.१० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -