ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे, लुईसवाडी येथील ‘शुभ-दीप’ या बंगल्याच्या आवारात पाणी साचले आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास पाणी साचण्यास होताच, घटनास्थळी पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली.
कर्मचाऱ्यांकडून पंपाच्या साहाय्याने त्या ठिकाणचे पाणी काढण्याचे काम तातडीने सुरू केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.