मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सोमवारी दिवसभरात ४१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात आहे. तसेच तिसरी लाट येऊच नये यासाठी उपाययोजनाही केल्या जात आहे. लसीकरणालाही वेग दिला आहे. असे असताना पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. मुंबईत निर्बंधांमध्ये आणलेल्या शिथिलतेमुळे लोक बिनधास्त असल्याचे दिसत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी करणे, मास्क न वापरणे असे प्रकार समोर येत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका व्यक्तीकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला असून, मुंबईत कोरोनाची आर व्हॅल्यू पुन्हा एकदा १ हून अधिक झाली आहे. आर व्हॅल्यू अर्थात रिप्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ कोरोनाचा धोका वाढवत आहे. ज्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. तर सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा गर्दी होत आहे.
लोकलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.