नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आपत्तीनंतर भारताने मदत आणि बचावकार्य अधिक तीव्र केले असून, आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय यापूर्वी बेपत्ता झालेल्या सुमारे ५० भारतीय नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात आला आहे. (India Nepal Flood Relief Operation)
नेपाळमधील पूरस्थिती आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत सरकारकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधत या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच भारताकडून नेपाळला सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून मदतकार्याबाबत माहिती घेतली. (India Nepal Flood Relief Operation)
https://www.prahaar.in/2026/08/30/dynamic-thane-thane-mayor-varsha-marathon-concludes-in-the-presence-of-deputy-chief-minister-eknath-shinde/चीनमधून ५९८ भारतीय नेपाळमध्ये परतले :
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत ५९८ भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये परतले आहेत. चीनच्या बाजूला असलेल्या भागात जवळपास ९०० भारतीय नागरिक सुरक्षित असून, त्यांच्याशी भारतीय अधिकाऱ्यांचा संपर्क असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. मात्र, परिस्थिती अद्याप चिंताजनक असून २७५ हून अधिक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे १२८ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. (India Nepal Flood Relief Operation)
भारतीय हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणात मदत :
नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी भारताने मदत साहित्याची मोठी खेप पाठवली आहे. भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांमधून आतापर्यंत सुमारे ५७.५ टन मदत साहित्य नेपाळमध्ये पोहोचवण्यात आले आहे. या मदत साहित्यात पूरग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्ये तात्पुरते निवारे, तंबू, ब्लँकेट्स, औषधे, अन्नधान्य, स्वच्छता किट, सौर दिवे, पाण्याचे पंप आणि विविध विद्युत उपकरणे यांचा समावेश आहे. (India Nepal Flood Relief Operation)
https://www.prahaar.in/2026/08/30/nepal-floods-devastation-caused-by-massive-floods-in-nepal-over-500-people-stranded-across-six-hydroelectric-projects-rescue-operations-hampered-by-bad-weather/भारतीय लष्कराची विशेष पथके तैनात :
पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी भारतीय लष्कराची सुरुंग बचाव आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेष उपकरणे आणि तज्ज्ञांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम केले जात आहे. याशिवाय विशेष सुरुंग बचाव पथक, न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि अतिरिक्त मदत साहित्य घेऊन आणखी एक विमान काठमांडूला पाठवण्यात येत आहे. बचावकार्यादरम्यान आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याची तयारी भारताने ठेवली आहे. (India Nepal Flood Relief Operation)
NDRF आणि बेली ब्रिजचीही तयारी :
परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची मदत पाठवण्याची तयारी भारताने दर्शवली आहे. त्याचबरोबर पूरामुळे आणि भूस्खलनामुळे संपर्क तुटलेल्या भागांना जोडण्यासाठी बेली ब्रिज तसेच आवश्यक तांत्रिक पथके उपलब्ध करून देण्याची तयारीही भारताने व्यक्त केली आहे. नेपाळमधील बचावकार्य आणि भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याला भारत सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या कठीण परिस्थितीत भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, गरजेनुसार आवश्यक ती सर्व मानवतावादी मदत सुरूच ठेवणार असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. (India Nepal Flood Relief Operation)






