चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहे. परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी प्रवाशांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीच्या आधारे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून आंबडस परिसरातील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बीड : परळी तालुक्यातील मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक ...
चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी परिसरात एका वळणावर समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात अनेक प्रवाशांना दुखापत झाली असून काही प्रवाशांना गंभीर दुखापतही झाल्याची माहिती आहे. तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असे प्राथमिक माहितीच्या आधारे सांगण्यात येत आहे. दोन्ही बसची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये समोरील भाग चक्काचूर झाला असून या धडकेत सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहे.
स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आलं असून, पोलीस अपघाताच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.