रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षानुवर्षे माथेरानच्या पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरणारे शारलोट लेक यंदा गाळ काढण्याच्या कारणास्तव रिकामे करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
पावसाळ्यात माथेरानमधील धबधबे, हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि शारलोट लेक परिसरातील निसर्ग पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. विशेषतः मुंबई आणि पुणे परिसरातून वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या या काळात वाढते. मात्र, यंदा सुमारे बारा वर्षांनंतर शारलोट लेकचे पाणी सोडण्यात आल्याने या पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षणच कमी झाले आहे.
बीड : परळी तालुक्यातील मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक ...
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १० ऑगस्ट रोजी लेक रिकामा करण्याची आवश्यकता नसतानाही तो सोडण्यात आला. यासाठी कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी मात्र उपलब्ध नाही.
लेक कोरडा पडल्याचा परिणाम लॉज, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टॉल व टपरीधारकांसह अन्य स्थानिक व्यावसायिकांवर झाला आहे. चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही अनेक लॉजमध्ये अपेक्षित पर्यटकसंख्या नसल्याने खोल्या रिकाम्या राहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, माथेरानमध्ये स्वच्छता, कचरा, रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरही पर्यटक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दस्तुरी नाका आणि पार्किंग परिसरात कचरा साचल्याचे, रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे तसेच गटारे तुंबल्याचे आरोप करण्यात आले आहेत. “नियोजनशून्य कामांमुळे माथेरानच्या पर्यटनाची अवस्था बिकट झाली आहे,” असा आरोप नगरसेवक सचिन दाभेकर यांनी केला आहे.