धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१ सदस्य गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक बहिष्काराला सामोरे जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील सात लहान मुलांनाही या बहिष्काराचा फटका बसत आहे. (Chhattisgarh Social Boycott)
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर गावातील जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने कुटुंबाला समाजापासून वेगळे करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तेव्हापासून गावात राहत असूनही हे ३१ सदस्य सामाजिकदृष्ट्या एकाकी जीवन जगत असल्याचे सांगितले जात आहे. (Chhattisgarh Social Boycott)
उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. घरकामापासून ते ...
गावात बोलणेही ठरले 'गुन्हा'?
कुटुंबीयांचा आरोप आहे की, बहिष्काराच्या निर्णयानंतर गावातील लोकांना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली. कोणी त्यांच्याशी बोलले किंवा संबंध ठेवले, तर त्याच्यावर आर्थिक दंड आकारला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दंड ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (Chhattisgarh Social Boycott)
शेतीपासून सामाजिक कार्यक्रमांपर्यंत बहिष्कार :
सामाजिक बहिष्कारामुळे कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. गावातील लोकांना त्यांच्या शेतात काम करण्यासही मनाई करण्यात आल्याचा आरोप आहे. कुटुंबातील सुख-दुःखाच्या प्रसंगीही गावातील कोणी सहभागी होत नसल्याचे ते सांगतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्ययात्रेतही गावातील नागरिक सहभागी होत नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. (Chhattisgarh Social Boycott)
औषधे आणि किराणा घेण्यासाठी दुसऱ्या गावाचा आधार :
बहिष्काराचा सर्वाधिक परिणाम दैनंदिन गरजांवर होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गावातील किराणा दुकानदार आणि मेडिकल स्टोअरमधून सामान किंवा औषधे देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलांसाठी बिस्किटे घ्यायची असोत किंवा आजारी व्यक्तीसाठी औषधे, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या गावात जावे लागत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (Chhattisgarh Social Boycott)
'आपल्याच गावात कैद झाल्यासारखे वाटते' :
गेल्या दोन वर्षांपासून आपल्याच गावात परक्यांसारखे जीवन जगावे लागत असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी म्हटले आहे. गावात राहत असूनही सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे एकटे पाडण्यात आल्याने हे जीवन एखाद्या खुल्या तुरुंगासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Chhattisgarh Social Boycott)
नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ...
एका व्यक्तीच्या दबावाचा आरोप :
पीडित कुटुंबाने जय राम जी नावाच्या व्यक्तीवरही गंभीर आरोप केले आहेत. गावात त्याचा प्रभाव असून त्याच्या सांगण्यावरून सामाजिक बहिष्कारासारखे निर्णय घेतले जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. (Chhattisgarh Social Boycott)
न्यायासाठी प्रशासनाकडे धाव :
दोन वर्षांपासून सामाजिक बहिष्काराचा सामना करणाऱ्या कुटुंबाने अखेर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कुटुंबीयांनी आपली तक्रार प्रशासनाकडे दाखल करून संपूर्ण प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामाजिक बहिष्कारातून मुक्तता मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Chhattisgarh Social Boycott)
प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन :
या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी इंदिरा देवहारी यांनी तक्रारीचा अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. संबंधित एसडीएमला या प्रकरणाची माहिती देण्यात येणार असून, घटनास्थळी जाऊन दोन्ही पक्षांना बोलावून चर्चा केली जाईल. त्यानंतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Chhattisgarh Social Boycott)




