Ganpatipule Beach : पर्यटकांची प्रतीक्षा संपली! गणपतीपुळे समुद्रकिनारा खुला, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल 60 दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Ganpatipule Beach)


पावसाळ्यात गणपतीपुळेचा समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 26 जूनपासून समुद्रकिनारा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील धोका कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी किनारा पुन्हा खुला करण्याची मागणी केली होती.





या मागणीवर निर्णय घेण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी केली. त्यानंतर सोमवारी दुपारपासूनच गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.


किनारा खुला झाल्याने गणपतीपुळ्यात पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.


मात्र, समुद्रकिनारा खुला झाला असला तरी पर्यटकांनी सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. समुद्राच्या खोल पाण्यात उतरू नये, तसेच जीवरक्षक आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : पत्रकारावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरातून तिघे ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील थोरात आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Nashik : कांद्याच्या दरात वाढ, दर नियंत्रणासाठी ‘कांदा एक्स्प्रेस’ सुरू

Nashik : देशभरात कांद्याच्या दरात तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारने बाजारातील कांद्याचा पुरवठा

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Ahilyanagar : सोन्याचे गंठण, चांदीचे सिंहासन लंपास, शेंडीतील मळगंगा देवी मंदिरात चोरी

Ahilyanagar : शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील मळगंगा देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने देवीच्या