Nashik : वीजचोरी करून व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या (Mahavitran) नाशिक भरारी पथकाने धडक कारवाई केली असून, सिन्नर, येवला आणि वणी परिसरातील १४ जणांविरुद्ध एकाच दिवशी, १९ ऑगस्ट रोजी, मनमाड पोलीस ठाण्यात (Manmad Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये ही कारवाई करण्यात आली.
Nashik : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या महिलेच्या ...
एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल
महावितरणच्या भरारी पथकाने १९ जून २०२६ रोजी सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे सात ठिकाणी, तर ६ व ७ जुलै रोजी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व चिचोंडी शिवारातील १२ ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली होती. तसेच वणी शहरातील चार ठिकाणीही वीजचोरीची प्रकरणे आढळून आली होती. या कारवाईनंतर संबंधित ग्राहकांना वीजचोरीपोटी आकारण्यात आलेली थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली. त्यापैकी नऊ ग्राहकांनी नियमानुसार थकीत वीजबिलाचा भरणा केला. मात्र, उर्वरित १४ ग्राहकांनी थकबाकी न भरल्याने त्यांच्याविरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात (Manmad Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले.
Nashik Crime News : नाशिकच्या शरणपूर रोडवरील न्यू पंडित कॉलनीत मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. ‘अरिहंत’ बंगल्यात कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात ...
वीजचोरीविरोधातील मोहीम सुरूच राहणार
ही तक्रार नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार रामनारायण तिवारी यांनी दाखल केली आहे. ही कारवाई सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गीते, कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमितकुमार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वीजचोरीमुळे महावितरणच्या यंत्रणेवर तसेच प्रामाणिक वीज ग्राहकांवरही परिणाम होतो. त्यामुळे अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीजचोरीविरोधातील ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.





