मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत, तर अनेक भागांत दमट आणि उष्ण हवामान जाणवत आहे. 21 ऑगस्ट रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. (Maharashtra Weather)
कोकण विभागातही पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. 21 ऑगस्ट रोजी कोणताही पावसाचा अलर्ट नसून काही भागांत हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. दमट हवामानासोबत काही काळ सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. (Weather Update)
राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये पावसाची वेगवेगळी ...
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. घाटमाथ्यावरील भागातही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. ( Weather News)
मराठवाड्यात गुरुवारी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, 21 ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट नाही. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस नसल्याने या भागातील पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणी आणि उभ्या पिकांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना आहे. (Marathwada Weather)
विदर्भातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस बहुतांश भागात कोरडे, दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अलर्ट नाही. पुढील चार ते पाच दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे आणि पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Marathwada Weather)





