बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन हंगामांत झालेल्या तब्बल ३१ कोटी रुपयांच्या (४० कोटी बांगलादेशी टाका) प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे यावर्षी बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) ही प्रतिष्ठित टी-२० स्पर्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकातही मोठा फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.
- गणेशोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; लाखो गणेश भक्तांना दिलासा मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा ...
तमीम इक्बाल यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, जोपर्यंत मंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि फ्रँचायझींशी संबंधित वाद पूर्णपणे सुटत नाहीत, तोपर्यंत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करणे योग्य नाही. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सहा, १२ किंवा २४ महिने लागले तरी मंडळाला ते मान्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. बीसीबी सध्या देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकावर काम करत असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
- गृह विभागाकडून ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी; मुंबईसाठी ३६२ मनुष्यबळाची मर्यादा, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र निकष मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे ...
या आर्थिक संकटाचा आणि नियोजनातील बदलांचा थेट परिणाम आगामी भारत-बांगलादेश मालिकेवर पडला आहे. या मालिकेच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतात, असे तमीम यांनी सांगितले आहे. मंडळाचा मुख्य भर सध्या देशांतर्गत क्रिकेट सुधारण्यावर आणि खेळाडूंना विश्वासात घेण्यावर असून, बीपीएल अधिक मजबूत स्वरूपात पुनरागमन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.






