Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका


मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षभरात पार पडण्याची शक्यता बऱ्यापैकी मावळली असून, या सर्व निवडणुका आता पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्येच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आयोगाच्या या भूमिकेमुळे आणि कायदेशीर बाबींमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. (Local Body Elections)



राज्यात मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या २११ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा जानेवारी २०२७ पूर्वी होण्याची चिन्हे धूसर झाली आहेत. सध्या राज्यभरात मतदार याद्यांच्या 'एसआयआर' मोहिमेचे काम वेगाने सुरू असून, या मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी येत्या २७ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकांची कार्यवाही सुरू करता येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या याद्या या विधानसभा मतदारसंघनिहाय असणार असून, त्यानंतर २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या हद्दीनुसार त्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागेल. या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यांची पूर्तता करण्यासाठी नोव्हेंबर महिना संपण्याची शक्यता आहे. (Local Body Elections)


या सर्व तांत्रिक प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाला डिसेंबर महिन्यातच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करावा लागेल, ज्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पुढील वर्षात सरकणार आहे. दुसरीकडे, राज्यातील १०५ नगरपंचायतींची मुदत आगामी फेब्रुवारी २०२७ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास फेब्रुवारी २०२७ मध्येच संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया एकत्र पार पडू शकते. (Local Body Elections)

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर