Thursday, August 13, 2026

Vinod Tawde : “संसदेचा ६१ टक्के वेळ वाया गेला; याला राहुल गांधी जबाबदार” विनोद तावडेंची टीका

Vinod Tawde : “संसदेचा ६१ टक्के वेळ वाया गेला; याला राहुल गांधी जबाबदार” विनोद तावडेंची टीका

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार म्हणून आपले हे पहिले संसदीय अधिवेशन असल्याचे सांगत भाजप नेते विनोद तावडे यांनी संसदेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर आणि विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

तावडे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जवळपास १८ ते २० वर्षे काम केले आहे. त्यामुळे संसदेतील अधिवेशनाबाबत त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या. मात्र, पहिल्याच अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनातील केवळ ३९ टक्के वेळेत कामकाज झाले, तर ६१ टक्के वेळ वाया गेला, असा दावा तावडेंनी केला. संसद चालवण्यासाठी करदात्यांच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर खर्च होत असताना कामकाजाचा वेळ वाया जाणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

“संसदेचे कामकाज का वाया गेले, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे,” असे तावडे म्हणाले.

सरकार चर्चेसाठी तयार होते, गृहमंत्रीही चर्चेसाठी उपस्थित राहण्यास तयार होते; मात्र विरोधकांनीच चर्चेला तयार न राहता संसदेबाहेर आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना तावडेंनी त्यांना “रील मास्टर” असे संबोधले. “विरोधी पक्षनेते जर संसदेऐवजी रील बनवण्यात व्यस्त असतील, तर हे देशाचे दुर्दैव आहे,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, तावडेंच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेतील कामकाजावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >