Jalgaon Crime : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात मंगळवारी धाकादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे रस्त्यावर पुरुष जातीचं मृत अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रक्तानं माखलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. अर्भक रस्त्यावर कसं आलं आणि ते तिथं कोणी आणून टाकलं? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून ...
नेमकी घटना काय घडली ?
शहरातील आंबेडकरनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील एका गल्लीत मंगळवारी पहाटे नागरिकांना रस्त्यावर रक्ताने माखलेले मृत अर्भक दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे (Shanipeth Police Station) पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले आणि पंचनामा केला.
दाट लोकवस्ती असलेल्या या गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हे अर्भक टाकून तेथून काढता पाय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पहाटेच्या सुमारास परिसरातून कोणाची ये-जा झाली होती, कोणती संशयास्पद हालचाल नागरिकांच्या निदर्शनास आली का, तसंच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून काही माहिती मिळते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे
Nashik :नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरू आहे. या काळात २.६ ते ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे तब्बल ४५ धक्के ...
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शनिपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याचा जन्म कुठे झाला आणि त्याला येथे कोणी आणून टाकलं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. फॉरेन्सिक तपासातून मिळणारे पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मृत अर्भक रस्त्यावर आढळल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे.