Friday, August 7, 2026

Visa Layoffs: AI मुळे Visa मध्ये 2,600 कर्मचाऱ्यांची कपात; भारतातील शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणामाची शक्यता

Visa Layoffs: AI मुळे Visa मध्ये 2,600 कर्मचाऱ्यांची कपात; भारतातील शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणामाची शक्यता

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर नोकरी कपातीचे प्रमाण वाढत असताना आता पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी Visa नेही मोठी कर्मचारी कपात केली आहे. AI-आधारित कार्यक्षमता वाढवण्याच्या (Efficiency Drive) धोरणाअंतर्गत कंपनीने जगभरातील सुमारे 2,600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 7 टक्के आहे. या कपातीचा फटका भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसल्याची माहिती समोर येत आहे. (LayOffs)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना नोकरी संपुष्टात आल्याचे ई-मेल मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या प्रणालींवरील प्रवेशही बंद करण्यात आला. बेंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथील Visa कार्यालयांमधील अनेक कर्मचारी या प्रक्रियेमुळे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. ( Visa Layoffs)

भारतात किती कर्मचारी प्रभावित?

भारतातील किती कर्मचाऱ्यांची नोकरी गेली याबाबत कंपनीने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील काही दाव्यांनुसार, बेंगळुरूतील Visa च्या टेक्नॉलॉजी सेंटरमधील सुमारे 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. भारतात Visa चे सुमारे 3,500 कर्मचारी असून, कपात झालेल्यांमध्ये अंदाजे 500 अभियंते आणि 900 इतर विभागांतील कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीला कंपनीकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

AI मुळे का झाली कर्मचारी कपात?

कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही कर्मचारी कपात आर्थिक अडचणीमुळे नसून, भविष्यात अधिक वाढीची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये संसाधने वळवण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन मॅकइनर्नी यांच्या मते, AI मुळे काम करण्याची पद्धत झपाट्याने बदलत असून Visa देखील त्या बदलाशी जुळवून घेत आहे. ( AI Job Loss)

'Agentic AI' कडे कंपनीचा कल

या पुनर्रचनेमागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे Visa आता पारंपरिक AI साधनांऐवजी 'Agentic AI' तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. हे AI सिस्टम मानवी हस्तक्षेप किंवा सततच्या देखरेखीशिवाय स्वतंत्रपणे अनेक कामे पार पाडू शकतात. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्या अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून, त्याचा परिणाम काही पारंपरिक नोकऱ्यांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >