Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ ते ९ ऑगस्टदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर तसेच काही जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकण-गोवा पट्ट्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)


६ ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे डोंगराळ भाग, घाटमार्ग आणि नदीकाठच्या परिसरात विशेष काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)



या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :


रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर



या जिल्ह्यांना यलो अलर्ट :


ठाणे, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर



पुण्यात कसं राहणार हवामान?


६ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. (Maharashtra Weather Update)



६ ते ९ ऑगस्ट विभागनिहाय हवामान अंदाज :


गुरुवार ६ ऑगस्ट
कोकण : बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस.
मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस, घाट भागात जोरदार ते खूप जोरदार पाऊस.
मराठवाडा : तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.
विदर्भ : काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. (Maharashtra Weather Update)



शुक्रवार ७ ऑगस्ट
कोकण : बहुतांश भागात पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी.
मध्य महाराष्ट्र : काही भागांत पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस.
मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट.
विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता.


शनिवार ८ ऑगस्ट
कोकण : बहुतांश भागात पावसाची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट.
मराठवाडा : काही ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट.
विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता. (Maharashtra Weather Update)


रविवार ९ ऑगस्ट
कोकण : बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम.
मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट.
मराठवाडा : काही भागांत पाऊस आणि विजांचा कडकडाट.
विदर्भ : काही ठिकाणी पावसाची शक्यता.



नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला :


हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, हवामानाच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. पावसामुळे काही भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील चार दिवस नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. (Maharashtra Weather Update)

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या