Vikroli Crime : 'गाणी हळू वाजव' एवढंच बोलला अन्... ; दोन सख्या भावांमध्ये रक्तरंजित खेळ; दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल नगर येथे एकाच कुटुंबातील भावांमध्ये झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत एका व्यक्तीसह त्याच्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai News)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नगरमध्ये राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबातील चार भाऊ एकाच घरात राहत होते. त्यापैकी काही जण घराच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (40) यांनी मोठ्या आवाजात गाणी लावल्याने त्यांच्या भावांमध्ये वाद झाला. (Vikroli)



या आवाजाबाबत सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. आरोपानुसार, सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्राने सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. (Family Dispute)


या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Police)


घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. (Crime News)


या घटनेमागील नेमके कारण आणि वादाचे स्वरूप याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे विक्रोळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Crime)


Comments
Add Comment

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

WhatsApp New Features Update : WhatsApp वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! Metaकडून ३ नवी सुरक्षा फीचर्स; अकाउंट हॅकिंगला बसणार आळा

मुंबई : WhatsApp वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी Metaने तीन नवीन सुरक्षा अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.