मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८ दशलक्ष लिटर (ML) पाणीसाठा उपलब्ध आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतचा जलाशयांचा अहवाल पाहता एकूण उपयुक्त जिवंत पाणीसाठा ९५.८३ टक्के इतका आहे. सातही जलाशयांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. (Mumbai Water Stock)
पालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनीअर विभागाच्या अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यांचा समावेश आहे. (Mumbai Water Stock)
कोणत्या जलाशयात किती पाणीसाठा?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा जलाशयात २,०३,७८९ ML पाणीसाठा असून तो ८९.७६ टक्के भरला आहे. या भागात गेल्या २४ तासांत ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोडक सागरमध्ये १,२८,९१० ML पाणीसाठा असून जलाशय ९९.९९ टक्के भरला आहे, तर गेल्या २४ तासांत ४ मिमी पाऊस झाला. (Mumbai Water Stock)
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
तानसा जलाशयात १,४३,१८१ ML म्हणजेच ९८.६९ टक्के पाणीसाठा असून गेल्या २४ तासांत २ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य वैतरणा जलाशयात १,८७,७५५ ML पाणीसाठा असून तो ९७.०२ टक्के भरला आहे. येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Mumbai Water Stock)
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या भातसा जलाशयात ६,८७,६८१ ML पाणीसाठा असून तो ९५.९१ टक्के भरला आहे. गेल्या २४ तासांत येथे ६ मिमी पाऊस झाला. विहार तलावात २७,६९८ ML पाणीसाठा असून तो तब्बल १०० टक्के भरला आहे. येथे गेल्या २४ तासांत पावसाची नोंद झालेली नाही. तर तुळशी तलावात ७,९४४ ML पाणीसाठा असून तो ९८.७४ टक्के भरला आहे. तुळशी परिसरात गेल्या २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Mumbai Water Stock)
विहार तलाव १०० टक्के भरल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातही जलाशयांचा एकत्रित पाणीसाठा ९५.८३ टक्के इतका आहे.
सात जलाशयांपैकी विहार तलावात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मोडक सागरमध्ये ९९.९९ टक्के, तानसा तलावात ९८.६९ टक्के, तर तुळशी तलावात ९८.७४ टक्के पाणीसाठा आहे.
मध्य वैतरणामध्ये ९७.०२ टक्के आणि भातसा जलाशयात ९५.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अप्पर वैतरणा हा सातही जलाशयांपैकी तुलनेने कमी भरलेला असून त्यात ८९.७६ टक्के पाणीसाठा आहे. (Mumbai Water Stock)
मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी २८ ...
२४ तासांत मध्य वैतरणाच्या पाणीसाठ्यात वाढ :
गेल्या २४ तासांत मध्य वैतरणा जलाशयाच्या पाणीसाठ्यात ०.१७ मीटरने वाढ झाली आहे. भातसा जलाशयातही ०.०४ मीटरची वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे तानसा तलावाच्या पातळीत ०.०३ मीटर, तर तुळशी तलावाच्या पातळीत ०.०१ मीटरची घट झाली आहे. इतर जलाशयांमध्ये पाण्याच्या पातळीत विशेष बदल झालेला नाही. (Mumbai Water Stock)
मुंबईकरांना पाण्याचा दिलासा :
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी हे सात जलाशय अत्यंत महत्त्वाचे आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या जलाशयांच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला सातही जलाशयांतील साठा ९० टक्क्यांच्या आसपास होता, तर त्यानंतरच्या पावसामुळे साठ्यात आणखी वाढ झाली. (Mumbai Water Stock)