ग्लासगो: ग्लासगो येथे रंगलेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांची २३ वी आवृत्ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेच्या समारोप समारंभादरम्यान ग्लासगो येथे झालेल्या दिमाखदार 'हस्तांतरण' सोहळ्यात भारताकडे अधिकृतपणे यजमानपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. आता या क्रीडा महोत्सवाची २४ वी आवृत्ती म्हणजेच २०२३ चे राष्ट्रकुल खेळ भारतामधील ऐतिहासिक शहर असलेल्या अहमदाबाद येथे आयोजित केले जाणार आहेत. रविवारी ग्लासगो येथे पार पडलेल्या या सोहळ्यात भारताने अधिकृतपणे राष्ट्रकुल खेळांचा ध्वज आणि बॅटन स्वीकारले आहे.
या हस्तांतरणासह अहमदाबाद २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमान शहर म्हणून आपल्या नव्या प्रवासाला अधिकृतपणे सुरुवात करत आहे. विशेष म्हणजे, अहमदाबादमध्ये होणारे २०३० चे राष्ट्रकुल खेळ हे या प्रतिष्ठित खेळांचे शताब्दी वर्ष देखील असणार आहे, कारण राष्ट्रकुल खेळांची पहिली आवृत्ती १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे भरवली गेली होती. या महत्त्वपूर्ण समारोप व हस्तांतरण सोहळ्यासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी ग्लासगो येथे उपस्थित होते.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी अभूतपूर्व यशाचा झेंडा रोवला आहे. ग्लासगो येथे सुरू असलेल्या या महामुकाबल्यात ...
सांस्कृतिक कार्यक्रमांचे अनोखे सादरीकरण
यजमानपदाच्या या ऐतिहासिक हस्तांतरण सोहळ्यात भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जागतिक पटलावर झळकली. हा भव्य सोहळा प्रामुख्याने तीन भागांमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात 'वंदे मातरम'च्या १५० व्या जयंतीनिमित्त एक विशेष सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर भारताचे प्रतिभावान सतारवादक ऋषभ ऋखीराम शर्मा आणि स्कॉटिश बॅगपायपर रॉस ऍस्ले यांच्यात झालेली शास्त्रीय संगीताची जुगलबंदी उपस्थितांच्या विशेष आकर्षण ठरली. अंतिम आणि मुख्य पर्वात भारताच्या अफाट सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवण्यात आले, ज्यामध्ये गुजरातच्या संस्कृतीवर विशेष भर देण्यात आला होता.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दहावा दिवस भारतासाठी अत्यंत यशस्वी आणि ऐतिहासिक ठरला आहे. स्पर्धेच्या या महत्त्वपूर्ण दिवशी भारतीय ...
परंपरा आणि आधुनिकतेचा संगम: किंग्ज बॅटन रिले
राष्ट्रकुल खेळांची अत्यंत महत्त्वाची आणि जुनी परंपरा असलेल्या 'किंग्ज बॅटन रिले' या स्पर्धेत ७४ राष्ट्रकुल देश व प्रदेशांचा सहभाग असतो. यंदाच्या आवृत्तीत एक ऐतिहासिक बदल करण्यात आला असून, प्रथमच प्रत्येक राष्ट्रकुल देश आणि प्रदेशाला त्यांची स्वतःची एक विशेष बॅटन तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक देशाने आपली संस्कृती आणि सर्जनशीलता जगासमोर मांडली आहे. या सर्व बॅटन्सवर ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या संदेशाचा काही भाग कोरलेला असतो, आणि समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवडक व्यक्ती ही बॅटन वाहून नेतात. बॅटन रिलेची ही अभिमानास्पद परंपरा १९५८ मध्ये कार्डिफ येथे सुरू झाली होती.
ग्लासगो २०२६ च्या मुख्य विपणन आणि कार्यक्रम अधिकारी लुईसा महोन यांनी या सोहळ्याबाबत बोलताना सांगितले की, हा हस्तांतरण सोहळा केवळ एक कायदेशीर औपचारिकता नसून, यादरम्यान दोन्ही देशांची सामायिक भावना एकाच मंचावर दिसून आली. भारताच्या हस्तांतरण सोहळ्याच्या संचालिका चंदा सिंग यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण कार्यक्रम एका अशा आधुनिक भारताचे प्रतिबिंब दाखवणारा होता, जो आत्मविश्वासाने परिपूर्ण असण्यासोबतच आपल्या प्राचीन परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे.
अहमदाबाद २०३० मधील हे शताब्दी वर्षातील राष्ट्रकुल खेळ भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरतील आणि या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आता दिमाखात झाली आहे.