आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जरांगेंना पाठवणार
मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार (Mahayuti Government) अत्यंत सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात घेतलेली भूमिका आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने घेतली नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आतापर्यंत मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल त्यांना पाठवला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंद पडलेल्या सर्व योजना पूर्ववत सुरू केल्या आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतील रुग्णालयात धक्कादायक प्रकार; नवजात बाळ कचरापेटीत सापडल्याने खळबळ
मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर (Trauma Care) रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय अविवाहित तरुणीने रुग्णालयातील स्वच्छतागृहात ...






