Ahilyangar : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, संतापाच्या भरात सासूने केलं असं काही की...

Ahilyangar : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग अनावर झाल्याने तिच्या आईने केलेल्या या एका कृतीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने भडकलेल्या आईने मुलीच्या पतीला थेट न्यायालयाच्या आवारात अडवण्याचा प्रयत्न केला. बरं यानंतर मुलीची आई चक्क जावई चालवत असलेल्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. धक्कादायक म्हणजे मारहाणीच्या भीतीने त्याने कार पळवली मात्र तरीही आई खाली उतरली नाही.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील मातापूर येथील एका तरुणीने दहा दिवसांपूर्वी केसापूर येथील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मुलगी घरातून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, दोघांनीही विवाह केल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात (Court) पोहोचले. सोमवारी दोघेही न्यायालयात हजर झाले. ते सज्ञान असल्याने न्यायालयाने त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या आईला मान्य नव्हता.



सासू थेट जावयाच्या कारच्या बोनेटवर चढली अन्


न्यायालयाबाहेर येताच तिने जावयाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि थेट त्याच्या कारच्या बोनेटवर जाऊन बसली. घाबरलेल्या तरुणाने कार सुरू केली. तरीही ती महिला बोनेटवरून खाली उतरली नाही. न्यायालय परिसरापासून सय्यदबाबा दर्गा परिसरापर्यंत हा थरार सुरूच होता. दरम्यान, महिलेने कारची काच फोडण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी कार थांबवली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत वाद मिटवला.


दोघेही सज्ञान असल्याने त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच कारच्या नुकसानीबाबत तरुणाने कोणतीही तक्रार दिली नाही, तर महिलेनेही गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने हे प्रकरण अखेर समोपचाराने निकाली काढण्यात आले.

Comments
Add Comment

Navnath Ban : डायपरसारखी अवस्था झालेल्या उबाठाकडे लक्ष द्या मगच अमित शाह यांच्यावर टीका करा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात मुंबई : संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात तर तुमचा

Nashik : आपले सरकार प्रणालीत राज्यात नाशिकचा ७ वा क्रमांक

Nashik : शासनाच्या आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) वरील लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा वितरणाच्या राज्यस्तरीय

Dattatray Bharne : एकही पात्र शेतकरी १०० टक्के कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

 कृषिमंत्री दत्ता भरणे; ऑगस्टमध्ये १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी

Kirti Kulhari : बॉलीवूड अभिनेत्री सायबर क्राईमची शिकार; अवघ्या काही मिनिटात बँक खाते झाले रिकामे

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सायबर फसवणूक मनोरंजन विश्वातून एक सायबर फ्रॉड(Cyber ​​Fraud) संबंधी धक्कादायक

Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे